8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ४४,२८० रुपयांपर्यंत होणार का वाढ?
नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ८ वा वेतन आयोग पगार आणि पेन्शनमध्ये चांगलीच वाढ देऊ शकतो. अॅम्बिट कॅपिटलच्या रिपोर्टनुसार, पगार ३०-३४% पर्यंत वाढू शकतात, जे २०२६ किंवा २०२७ या आर्थिक वर्षात लागू होऊ शकतात. जाणून घ्या वाढ…

८ वा वेतन आयोग
केंद्रीय कर्मचारी ८व्या वेतन आयोगाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण त्यांच्या पगारात घसघशीत वाढ झालेली दिसून येईल. त्यांना प्रलंबित रक्कम मिळाली तर एक मोठी रक्कम त्यांच्या हातात पडेल. त्यानंतर हा वेतन आयोग्य राज्य सरकारही लागू करेल. त्यामुळे राज्य सरकरी कर्मचारीही याची वाट बघत आहेत.
पगार ३०-३४% वाढू शकतो
नवीन वेतन रचनेमुळे एकूण पगार ३०-३४% वाढू शकतो. पगारात एवढी मोठी एकरकमी वाढ मिळाली तर त्यांना मोठा आर्थिक लाभ झालेला दिसून येईल. त्यांची खरेदी शक्ती वाढलेली असेल. त्यांना मोठे आर्थिक निर्णय घेता येतील.
२०२६ किंवा २०२७ महत्त्वाचे
हे बदल २०२६ किंवा २०२७ मध्ये लागू होऊ शकतात. त्यामुळे या पगारवाढीची आतुरतेने वाट बघितली जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी संबंधित व्यवसायही याची वाट बघत आहेत. कारण याचा लाभ त्यांनाही होणार आहे. त्यांची विक्री वाढलेली दिसून येईल.
सध्या ६ व्या वेतन आयोगानुसार पगार
सध्याचे वेतन २०१६ च्या ७व्या वेतन आयोगावर आधारित आहे. पण बाजारपेठेचा विचार केला तर सध्याही ही वाढ प्रचंड आहे. त्यामुळे काही वर्षांचा अनुभव असलेला केंद्रीय आणि राज्य सरकारचा कर्मचारी साधारणपणे ७० ते ९० हजार रुपये घरी नेत आहे.
दहा वर्षांनी वेतन दुरुस्ती
दर दहा वर्षांनी वेतन रचना दुरुस्त केली जाते. याचा नियम करण्यात आला आहे. प्रत्येक १० वर्षांनी सरकारी कर्मचार्यांना ही वाढ दिली जाते. ती कधी लागू केली जाते तेही महत्त्वाचे असते. कारण आधी लागू केली असेल तर प्रलंबित रक्कम कर्मचार्यांना द्यावी लागते.
मोठी वाढ मिळेल
८वा वेतन आयोग ही परंपरा कायम ठेवेल असे दिसून येत आहे. सध्या या वेतन आयोगाची मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा
फिटमेंट फॅक्टर म्हणजे नवीन मूळ वेतन निश्चित करण्याचा गुणक आहे. त्यातून मूळ वेतन निश्चित केले जाते. या वेतन आयोगात याचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
किमान वेतन वाढ ३२,९४०
किमान वेतन वाढ ३२,९४० किंवा ४४,२८० रुपये होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या पगारात कर्मचार्यांना मोठी वाढ मिळेल.
मोठी तफावत
५०,००० चे वेतन ९१,५०० ते १.२३ लाख होऊ शकते. म्हणजेच जवळपास दुपटीने वेतन वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा शासकीय कर्मचार्यांना होताना दिसून येईल.
महागाईनुसार पेन्शन
महागाईनुसार पेन्शनची रक्कम अपडेट होईल. त्यामुळे पेन्शनधारकही याची वाट बघत आहे. त्यांनाही याचा आर्थिक लाभ होताना दिसून येईल.