- Home
- Entertainment
- जे मी केलंच नाही, ते माझ्या नावानं.... सलमान खानच्या वक्तव्यानं इंडस्ट्रीत उडाली खळबळ
जे मी केलंच नाही, ते माझ्या नावानं.... सलमान खानच्या वक्तव्यानं इंडस्ट्रीत उडाली खळबळ
बॉलिवुडचा दबंग खान, सलमान खान, त्याच्या आयुष्यातील विविध वादांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक आरोपांवर बोलताना, त्याने सांगितले की अनेक गोष्टी न करताही त्यांचे ओझे तो आजही वाहत आहे. त्याने आपल्या अनुभवांची तुलना संजय दत्तसोबत केली आहे.

जे मी केलंच नाही, ते माझ्या नावानं.... सलमान खानच्या वक्तव्यानं इंडस्ट्रीत उडाली खळबळ
बॉलिवुडमधला दबंग खान हा कायमच चर्चांमध्ये राहत असतो. सध्या तो लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून त्यानं आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
सलमान खान कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिला?
सलमान खान हा विविध कारणांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. तो राजस्थानमधील शूटिंगच्या दरम्यान काळवीटाची शिकार असो, ऐश्वर्या रायबरोबर झालेला वाद असो किंवा विवेक ओबोरॉयला धमकी दिल्याचा आरोप असो यावरून कायमच चर्चेत राहिला आहे.
सलमान टीकेला उत्तर देताना काय म्हणाले?
सलमानच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, एखाद्या गोष्टीवर तू कशा पद्धतीने प्रतिसाद देतोस, यावरून तुला कायम लोक ओळखत असतात. मी हे स्वतः अनुभवलंय. ज्या प्रत्यक्षात घडल्या असून त्याला अजूनही सामोरं जात आहे.
लोक माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी...
सलमान म्हणाला की, माझ्यावर ज्या ज्या गोष्टींबद्दल आरोप झाले, त्यातल्या अनेक गोष्टी मी केल्यासुद्धा नाहीत; पण आजही त्याच ओझं माझ्यावर आहे. लोक माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलत असतात.
तू हे सगळं झेलू शकशील?
तुला वाटत का की, तू हे सगळं झेलू शकशील? हे जग खूप क्रूर आहे अमाल. तुझ्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया सहन करण्याचं मानसिक बळ आहे का?"
मी आणि संजय दत्त वाईट अनुभवांमधून...
मी आणि संजय दत्त अशा अनेक अनुभवांमधून गेला आहे. कुणाचा आदर केला की लोक म्हणतात की, दाखवण्यासाठी करतोय. इतक्या लहान लहान गोष्टीसुद्धा लक्षात राहतात.