- Home
- Utility News
- मुंबईत 58 कोटी लुटले, 58 दिवसांची Digital Arrest, हे प्रकरण वाचून डोक्याला येतील मुंग्या, नेमके काय घडले?
मुंबईत 58 कोटी लुटले, 58 दिवसांची Digital Arrest, हे प्रकरण वाचून डोक्याला येतील मुंग्या, नेमके काय घडले?
Digital Arrest : दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी जशी वाढत आहे, तशाच समस्याही वाढत आहेत. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. मुंबईतील एका सायबर स्कॅमने आता संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.

सायबर स्कॅम
आजकाल सायबर गुन्हे खूप वाढले आहेत. आमिष किंवा भीती दाखवून लोकांना लुटले जात आहे. आता सुशिक्षित लोकही या जाळ्यात अडकत आहेत. मुंबईतील अशाच एका घटनेने देशाला हादरवले आहे.
सायबर चोरांनी लुटले तब्बल ५८ कोटी रुपये
मुंबईतील एका व्यावसायिकाकडून सायबर चोरांनी तब्बल ५८ कोटी रुपये लुटले. 'डिजिटल अरेस्ट' करण्याची धमकी देऊन ही लूट केली. देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक आहे. विशेष म्हणजे डिजिटल अरेस्ट असे काहीच नसते.
नेमकं काय घडलं?
तीन आरोपी CBI, ED अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाला व्हिडिओ कॉल करायचे. मनी लाँड्रिंग प्रकरणात 'डिजिटल अरेस्ट' करण्याची धमकी दिली. बनावट कागदपत्रे दाखवून फसवणूक केली. या दांपत्याला डिजिटल अरेस्ट असा कोणताच प्रकार अस्तित्वात नाही याची माहिती नव्हती.
ऑगस्ट महिन्यापासूनच...
सायबर चोरांनी ऑगस्टमध्ये व्यावसायिकाशी संपर्क साधला. 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी देऊन ५८ कोटी उकळले. या प्रकरणी तिघांना अटक झाली असून, या टोळीचे नेटवर्क परदेशातही असण्याची शक्यता आहे.
