मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

| Published : Jul 13 2024, 07:31 PM IST

Narendra Modi Austria Visit
मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली.

मुंबई : लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून तब्बल 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी, पंतप्रधानांनी मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचे म्हटले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न असल्याचं मोदींनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी भाषणात लाडकी बहीण योजनेचा केला उल्लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी आवर्जून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे म्हटले.

‘मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार’

पुढे बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटले की, महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. येथील 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे. मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा लोकांनी आमचे स्वागत केले आहे, एनडीए सरकारचे स्थिरता देऊ शकते हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पटीने अधिक काम करणार आहे.

महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझं स्वप्न आहे.

आणखी वाचा :

Mumbai Heavy Rain News : पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडणार, हवामान विभागाने दिला इशारा

Aanandacha Shidha News : गणेशोत्सवानिमित्त सरकारकडून 'या' दिवशी मिळणार आनंदाचा शिधा, 562 कोटींचा खर्च