- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Update: अरे बापरे! इतकी उष्णता अचानक का वाढली? एप्रिलच्या 'या' तारखेपासून सुटणार घामाच्या धारा; कारण वाचून थक्क व्हाल!
Maharashtra Weather Update: अरे बापरे! इतकी उष्णता अचानक का वाढली? एप्रिलच्या 'या' तारखेपासून सुटणार घामाच्या धारा; कारण वाचून थक्क व्हाल!
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेचा अंदाज असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. वेस्टर्न डिस्टर्बन्स, दमट हवा, सायक्लोनिक सर्क्युलेशन या कारणांमुळे तापमानात अचानक वाढ होत आहे.

अरे बापरे! इतकी उष्णता अचानक का वाढली?
मुंबई: कधी अवकाळी पाऊस तर कधी अंगातून घामाच्या धारा... सध्या महाराष्ट्रातील हवामानाचा लपंडाव सुरू आहे. एप्रिलच्या सुरुवातीला गारपीट आणि पावसाने झोडपल्यानंतर, आता तिसऱ्या आठवड्यात मात्र राज्याला भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा ४० ते ४२ अंशांच्या पुढे जाण्याची भीती हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचे चटके!
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल. मात्र, इतर भागात सूर्य आग ओकणार आहे. १५ एप्रिलनंतर तापमानात झपाट्याने वाढ होणार असून उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
उष्णता अचानक का वाढणार? ही आहेत महत्त्वाची कारणे
वातावरणात एकाच वेळी अनेक बदल घडत आहेत, ज्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव.
दमट हवा: अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण आणि दमट हवेमुळे आर्द्रता वाढली आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशन: दक्षिण भारतात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.
पाऊस आणि उष्णतेचे दुहेरी संकट!
यावर्षी केवळ उन्हाळाच नाही, तर 'प्रि-मान्सून' पावसाचाही फटका बसण्याची शक्यता आहे. दुपारी कडक ऊन आणि घामाच्या धारा, तर संध्याकाळी पावसाची हजेरी असे विचित्र हवामान पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे, यंदा मान्सून उशिरा येण्याची आणि सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने चिंता अधिक वाढली आहे.
IMD चा इशारा
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heatwave) नसली, तरी तापमान ४० अंशांच्या वर गेल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मान्सूनबाबत अधिकृत अंदाज लवकरच प्रसिद्ध केला जाईल.

