
सोनम वांगचुक; राजीनामा ही सुरुवात
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी ही केवळ सुरुवात असल्याचे म्हटले. पुढे सकारात्मक संवादातून योग्य निर्णय झाल्यास देशासाठी अधिक चांगली व्यवस्था उभी राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार असून अशा आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.