
एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर टीका केली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींवर कठोर पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वायनाडमधील भूस्खलनाच्या वेळी राहुल गांधी देशात उपस्थित नसल्याचा आरोप करत, विरोधी पक्षनेते म्हणून अशा संकटाच्या काळात लोकांसोबत राहून मदत आणि समन्वयाची भूमिका बजावणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशावर परदेशातून टीका करणे योग्य नसल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
