संजय राऊतांचा सवाल, सोनम वांगचुकसाठी एकही मंत्री पुढे नाही?

Share this Video

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नागपूरमधील रामरक्षा पठण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना दिलेल्या निमंत्रणाबाबत भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या प्रतिक्रियेवरही त्यांनी भाष्य केले. याशिवाय जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या भेटी, परिसीमनावर सर्वपक्षीय चर्चेची मागणी, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारवर टीका, तसेच पुढील काही काळात देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात नेतृत्वबदल होऊ शकतो, असा दावा संजय राऊत यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डेटा चोरीच्या वक्तव्यावरूनही त्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

Related Video