सचिन अहिरांनी मुंबईतील पाणी साचण्यावर प्रशासनाला सुनावलं

Share this Video

मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या समोर आली आहे. ड्रेनेज यंत्रणेच्या स्वच्छतेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असून, अनेक कामे कंत्राटदारांकडे दिली जात असल्याने जबाबदारीचा मुद्दाही चर्चेत आला आहे.यावर प्रतिक्रिया देताना सचिन अहिर यांनी प्रशासनाने जनतेच्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घेऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असतानाही पावसाच्या तीव्रतेमुळे पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचे दिसत आहे. याशिवाय राज्यात सशक्त विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video