
महिला आरक्षणावर रणांगण, रितू तावडे यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला
महिला आरक्षण विधेयकावरून भाजपच्या महिला जनआक्रोश मोर्चात वातावरण तापलं आहे. Ritu Tawde यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत, महिलांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप केला.राहुल गांधी, शरद पवार यांच्या पक्षांसह विरोधी आघाडीवर निशाणा साधत त्यांनी सांगितलं की, महिला सक्षमीकरणासाठी भाजपने सातत्याने काम केलं आहे.या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.