मनोज जरांगेंना वाऱ्यावर सोडलं; संजय राऊतांचा आरोप

Share this Video

संजय राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून सरकारवर टीका केली. सरकारने निवडणुकीत जरांगेंच्या लढ्याचा फायदा घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला. जरांगेंची प्रकृती खालावत असून सरकारमधील प्रमुख व्यक्तीने त्यांच्याशी चर्चा करावी, तसेच मराठा आणि ओबीसी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी राऊतांनी केली.अमृता फडणवीस यांच्या सर्वधर्मसमभावासंदर्भातील भूमिकेचे राऊतांनी स्वागत करत हिंदुत्व सर्वसमावेशक असल्याचे म्हटले. राहुल नार्वेकर यांच्या पक्षांतरबंदी कायद्यावरील वक्तव्यावर त्यांनी टीका केली. रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातील वक्तव्यावर बोलताना शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी अबू सालेमची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी सरकार आणि देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यावरही त्यांनी उपरोधिक टीका केली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत राऊतांनी ते बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्याचे सांगत चिन्ह गोठवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीचे समर्थन केले आणि या प्रकरणाचा निकाल तातडीने लागावा, असे म्हटले.

Related Video