बाबासाहेब पाटील: शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ

Share this Video

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. सोमवारी किंवा मंगळवारी सुमारे 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यांच्या वारसांच्या नोंदी घेण्यासाठी महसूल, कृषी आणि सहकारी विभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवली जाणार आहे.कर्जमाफीसाठी सुमारे 13 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. कर्जमाफीसाठी एक-दोन महिन्यांची अंतिम मुदत नसून, शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत योजना सुरू राहणार असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.योजनेच्या प्रक्रियेत आतापर्यंत 32 लाख शेतकऱ्यांपैकी 17 लाखांची पहिली यादी करण्यात आली असून, त्यापैकी 12 लाख 80 हजार शेतकऱ्यांचं KYC verification पूर्ण झालं आहे. उर्वरित शेतकऱ्यांचं verification झाल्यानंतर त्यांनाही लाभ दिला जाणार आहे. सुमारे 2 लाख 30 हजार शेतकऱ्यांकडे Agro Stack नसल्याने त्यासाठीही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.दरम्यान, अभिमन्यू पवार यांच्या कारखान्याला 19 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केल्याबाबत बाबासाहेब पाटील यांनी नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप फेटाळला. हा भूकंपग्रस्त भागातील कारखाना असून, इतर उद्योगांची उपलब्धता नसलेल्या भागातील कारखान्याला मदत करण्याचा कॅबिनेटचा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या मारुती महाराज कारखान्यालाही NCDC कर्ज देण्यात आल्याचं उदाहरण त्यांनी दिलं.NCDCच्या कर्जाचा इतरत्र वापर झाल्याच्या तक्रारींबाबत तपासणी आणि समितीच्या अहवालानंतर आवश्यक दुरुस्ती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Video