
नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल
नक्षलवादाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकीय वादात शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नक्षलवाद संपवण्याचे श्रेय एका सरकारला देता येत नाही, हा दीर्घकालीन प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासोबतच त्यांनी इंटेलिजन्स फेल्युअर, महागाई, वेस्ट एशियातील युद्ध, भारत-अमेरिका व्यापार करार, रुपयाची घसरण आणि शेतकरी प्रश्न यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सरकारला सवाल केले.देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.