
नाना पटोलेंचा पावसातील मृत्यूंवर सरकारवर हल्ला
मुंबईतील पावसादरम्यान घडलेल्या दुर्घटनांवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली. झाड पडून एका बालकाचा मृत्यू आणि मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी पावसापूर्वीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रशासनाने कागदोपत्री कामे केली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी त्यांनी लातूरमधील शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरही सरकारला लक्ष्य केले. तसेच कायदा-सुव्यवस्था, विष्णोई गँगच्या धमक्या आणि राज्यातील परिस्थितीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
