
ऋतु तावडे: 15 जुलैनंतर पुन्हा रेड अलर्टची शक्यता
मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत महापौर ऋतु तावडे यांनी माहिती दिली. सध्या मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे, वाहतूक आणि इतर सेवा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत सुमारे 1100 झाडे किंवा फांद्या कोसळल्याची माहिती देत ती हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. झाडे आणि मॅनहोलचे Google Mapping व ऑडिट सुरू करण्यात आले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध दुर्घटनांतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून 15 जुलैनंतर पुन्हा रेड अलर्टची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
