
मराठा आरक्षण पुन्हा पेटलं! Manoj Jarange Patil यांचा ‘चलो मुंबई’ इशारा
मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर आला आहे. Manoj Jarange Patil यांनी ‘चलो मुंबई’चा नारा देत सरकारला थेट इशारा दिला आहे.‘हैदराबाद गॅझेट’च्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर धरत आहे. जर सरकारने ‘सगे-सोयरे’ आणि गॅझेटच्या आधारे निर्णय घेतला नाही, तर मुंबईत अनिश्चित काळासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, Devendra Fadnavis सरकारकडून कायदेशीर अडचणींचा उल्लेख करण्यात येत असताना, आंदोलक मात्र सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप करत आहेत.मराठा समाजाचा संयम संपत चालला असून, येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.