
मनोज जरांगेंचं मराठ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन
जालना येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आत्महत्या न करण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले. आंदोलनादरम्यान हिंसाचार, जाळपोळ आणि रस्ते अडवणे टाळण्यास त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मराठ्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत याचा बदला घेणार असल्याचे जरांगे म्हणाले. मराठा समाज मुंबईत येण्यासाठी तयार असून मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.