
Manoj Jarange
मराठा समाजाचे तरुण अनेक राजकीय पक्षासाठी काम करतात, पण त्यांनी आधी जातीला महत्व दिलं पाहिजे, मग इतर राजकीय पक्ष, असं मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीत म्हटलं आहे, याशिवाय अनेक महत्त्वाच्या विषयांवर ते बोलले, पक्ष आपला वापर करतात, आपल्याला गृहीत धरतात, असं मनोज जरांगे याचं मत आहे, तेव्हा आधी जातीचा व्हा आणि मग पटेल त्या पक्षाचा किंवा राजकारणाचे व्हा, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.