देशात LPG टंचाई? सरकार खोटं बोलतंय – संजय राऊतांचा आरोप

Share this Video

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार Sanjay Raut यांनी देशातील LPG गॅस टंचाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, पंतप्रधान Narendra Modi आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री Hardeep Singh Puri देशात गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा करत आहेत, मात्र प्रत्यक्षात अनेक राज्यांमध्ये नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये नागरिक LPG सिलेंडरसाठी एजन्सीबाहेर तासन्तास थांबत असल्याचे चित्र दिसत आहे. राऊत यांनी असा आरोपही केला की, या परिस्थितीमुळे सामान्य नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.राऊत यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, कदाचित सरकारला बाहेरून गॅस मिळत असेल, पण देशातील सामान्य माणूस मात्र सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे.

Related Video