
जय पवारांचा जनता दरबार चर्चेत
बारामतीत पहिल्यांदाच जनता दरबार घेतलेल्या जय पवारांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दादांसारखंच काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जय पवार यांनी सांगितलं. बारामतीतील पाणी, रस्ते, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केलं. राज्यसभेच्या चर्चांवरही जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली.