Indian Railways: ऊन-पावसातही रेल्वे रुळांना गंज का लागत नाही? जाणून घ्या कारण
Indian Railways: देशात रोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. पण रेल्वेशी संबंधित अनेक इंटरेस्टिंग गोष्टी लोकांना माहीत नसतात. त्यापैकीच एक म्हणजे रेल्वेचे रूळ गंजत का नाहीत? चला, यामागचं विज्ञान जाणून घेऊया.
16

Image Credit : x
अनेक दशके रूळ का टिकतात?
रेल्वेचे रूळ साध्या लोखंडाचे नसतात. ते एका खास प्रकारच्या स्टीलपासून बनवतात, ज्यात कार्बन आणि मँगनीजचं विशिष्ट मिश्रण असतं. यामुळे रूळ जास्त वजन तर पेलतातच, पण गंजण्याची प्रक्रियाही खूप हळू होते. म्हणूनच ते अनेक दशकं टिकतात.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : Meta AI
ट्रेनच्या चाकांमुळे रुळांवर सतत घर्षण
रोज हजारो किलोमीटर धावणाऱ्या ट्रेनच्या चाकांमुळे रुळांवर सतत घर्षण होतं. या घर्षणामुळे रुळांचा वरचा भाग नेहमी चकचकीत राहतो. गंज लागण्यासाठी ओलावा जास्त वेळ टिकायला हवा, पण चाकांच्या दाबामुळे आणि घर्षणामुळे रुळांवर पाणी किंवा ओलावा साचत नाही, त्यामुळे गंज पकडण्याची शक्यता कमी होते.
36
Image Credit : Asianet News
रूळांवरही गंज चढतो, पण.....
रेल्वे रुळांना अजिबात गंज लागत नाही, असं समजणं चुकीचं आहे. खरं तर, गंज लागतो, पण त्याचा वेग खूपच कमी असतो. रुळांसाठी वापरल्या जाणाऱ्या खास स्टीलमुळे हे शक्य होतं. रुळांच्या बाजूला थोडा गंज दिसला तरी, तो सुरक्षेसाठी धोकादायक पातळीवर पोहोचायला अनेक वर्षं लागतात.
46
Image Credit : Asianet News
सातत्याने तपासणी
रेल्वे अधिकारी रुळांची सतत तपासणी करत असतात. कुठे तडे गेले असतील, रुळांचं नुकसान झालं असेल किंवा जास्त गंज लागला असेल, तर ते लगेच दुरुस्ती करतात. गरज पडल्यास संपूर्ण रूळ बदलला जातो. जास्त दमट हवामान असलेल्या भागांमध्ये, रुळांवर संरक्षणात्मक लेप (protective coatings) सुद्धा लावले जातात.
56
Image Credit : X
गंजण्याचा परिणाम खूप कमी
जेव्हा लोखंड हवा आणि पाण्याच्या संपर्कात जास्त वेळ राहतं, तेव्हा एक रासायनिक प्रक्रिया होते. यात लोखंड ऑक्सिजनसोबत मिळून आयर्न ऑक्साईड बनवतं, ज्यालाच आपण 'गंज' म्हणतो. जास्त ओलावा असलेल्या ठिकाणी ही प्रक्रिया वेगाने होते. पण रेल्वे रुळांच्या बाबतीत खास स्टील आणि सततच्या घर्षणामुळे गंजण्याचा परिणाम खूप कमी असतो.
66
Image Credit : Asianet News
रेल्वेचे रूळ सुरक्षित आणि मजबूत राहणं आवश्यक
रेल्वे रूळ न गंजण्यामागे कोणतंही एक कारण नाही. खास दर्जाचं स्टील, ट्रेनची सततची धावपळ, संरक्षणात्मक लेप, नियमित तपासणी आणि वेळेवर होणारी दुरुस्ती, या सगळ्या गोष्टी एकत्र काम करतात. म्हणूनच ऊन-पावसाळा झेलत वर्षानुवर्षे सेवा देऊनही रेल्वेचे रूळ सुरक्षित आणि मजबूत राहतात.

