मुंबईत वेगवान वाऱ्याचा इशारा: Devendra Fadnavis

Share this Video

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती, पाणी साचणे आणि दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. Devendra Fadnavis यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी आणि प्रशासनासोबत परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती दिली.मुंबईमध्ये हाय टाइडसोबतच जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. काल 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहिल्यामुळे एका दिवसात सुमारे 350 झाडे पडली आणि 450 हून अधिक फांद्या तुटल्या. आज यापेक्षा अधिक वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य धोकादायक भाग रिकामे करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video