
राहुल गांधींवर फडणवीसांची टीका, 'भाषणात तथ्यच नसतं'
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावर टीका केली. राहुल गांधी यांच्या भाषणात कोणतेही ठोस तथ्य नसते, त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी वेळ नसल्याचे फडणवीस म्हणाले.देशातील युवकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन परीक्षा व्यवस्था आणली असून, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित होईल आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.