
रामदास आठवले यांची भूमिका, महाराष्ट्र दिन-बुद्ध जयंतीवर संदेश
महाराष्ट्र दिन, बुद्ध जयंती आणि कामगार दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांवर भर देत जागतिक शांततेची गरज अधोरेखित केली आणि कामगारांच्या हक्कांबाबतही भूमिका मांडली.तसेच जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करत, मराठी भाषेच्या मुद्द्यावर संतुलित भूमिका घेतली. मराठीचा सन्मान राखत हिंदीचाही आदर राखला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.