
आनंद दुबे यांचा हल्लाबोल मराठी सक्तीवरून सरकारवर टीका
मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना आनंद दुबे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठी भाषा शिकण्यासाठी प्लॅटफॉर्म द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांपासून सर्व नागरिकांना मराठी येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सरकारच्या भूमिकेतील गोंधळ, विरोधाभास आणि राजकीय नाट्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. यासोबतच इतर राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.