
Aaditya Thackeray यांचा हल्लाबोल! “९-१० मंत्र्यांनी राजीनामा द्यावा” सरकारवर गंभीर आरोप
२१ मार्च २०२६ रोजी दिलेल्या मुलाखतीत Aaditya Thackeray यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया दिली. तथाकथित ‘बोंदू बाबा’ प्रकरणावर बोलताना त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आणि संबंधित मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे स्पष्ट सांगितले.तसेच सरकारवर टीका करत त्यांनी राजकीय संस्कृती खालावल्याचा आरोप केला. एसआयटी चौकशीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही कारवाई खरोखर निष्पक्ष आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या मुलाखतीत त्यांनी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि पेट्रोल-डिझेल दरवाढ यांसारख्या मुद्द्यांवरही जोरदार टीका केली.