Defence Budget : भारत संरक्षण खर्चात जगात चौथ्या क्रमांकाचा देश कसा बनला? सविस्तर घ्या जाणून

भारत संरक्षण खर्चात जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. अमेरिका, चीन आणि रशिया या देशानंतर भारताचा क्रमांक लागतो. 

vivek panmand | Published : Feb 24, 2024 12:44 PM IST

Defence Budget : संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. भारतापेक्षा फक्त अमेरिका, चीन आणि रशिया संरक्षणावर जास्त खर्च करत आहेत. भारताचे संरक्षण बजेट दरवर्षी वाढत आहे. चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांकडून आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याने हे अत्यावश्यक आहे.

स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने 2022 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, संरक्षणावरील खर्चाच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर ($877 अब्ज खर्च), चीन दुसऱ्या स्थानावर ($292 अब्ज खर्च) आणि रशिया तिसऱ्या स्थानावर ($86.4 अब्ज खर्च) आहे. भारताचा संरक्षण खर्च 81.4 अब्ज डॉलर आहे. भारताच्या संरक्षणावरील एकूण खर्चापैकी 23 टक्के खर्च शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी करण्यात आल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे. संरक्षण बजेटचा बराचसा भाग पगार आणि पेन्शनवर खर्च झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारताचे संरक्षण बजेट सातत्याने वाढत आहे. 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या अंतरिम बजेटमध्ये संरक्षण बजेट 6.2 लाख कोटी रुपये ठेवण्यात आले होते. यातील 1.72 लाख रुपये नवीन शस्त्रे, विमाने, युद्धनौका आणि इतर लष्करी उपकरणे खरेदीसाठी ठेवण्यात आले आहेत. 2023 मध्ये सरकारने संरक्षण बजेट 5.93 लाख कोटी रुपये ठेवले होते. हा खर्च केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या 13 टक्के होता. 2022 मध्ये संरक्षण बजेट 5.25 लाख कोटी रुपये होते. 2021 मध्ये ते 4.78 लाख कोटी रुपये होते.

भारताचा संरक्षण निधी कुठे खर्च होतोय?
भारताच्या संरक्षण बजेटचा (Defence Budget) मोठा भाग पगार आणि वेतनावर खर्च होतो. 2024-2025 मध्ये यासाठी 1.41 लाख कोटी रुपये ठेवण्यात आले होते. 2024-25 च्या लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या बजेटमध्ये केवळ 6.17 टक्क्यांची नाममात्र वाढ झाली आहे. शस्त्रास्त्रे आणि त्यांचे भाग आयात करण्यासाठी भारताला आपल्या संरक्षण बजेटचा मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. आकडेवारीनुसार, भारताने गेल्या पाच वर्षांत परदेशातून 1.93 लाख कोटी रुपयांची लष्करी उपकरणे खरेदी केली आहेत. यामध्ये हेलिकॉप्टर, एअरक्राफ्ट रडार, रॉकेट, तोफ, असॉल्ट रायफल, क्षेपणास्त्रे आणि दारूगोळा यांचा समावेश होता.

भारताचा संरक्षण खर्च का वाढत आहे?
भारतासमोर चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारी राष्ट्रांकडून आव्हाने आहेत. चीनने आपली लष्करी क्षमता झपाट्याने वाढवली आहे. यासोबतच पाकिस्तानला शस्त्रे देऊन बळकट करत आहे. हे पाहता भारतालाही आपली लष्करी क्षमता मजबूत करावी लागणार आहे. भारताला दोन आघाडीच्या युद्धासाठी सदैव तयार राहावे लागते. 2020 मध्ये गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. तेव्हापासून दोन्ही देशांनी आपले सैन्य एकमेकांसमोर तैनात ठेवले आहे. चीन तिबेटमध्ये आपली लष्करी ताकद वाढवत आहे.

आणखी वाचा : 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातून 19 वर्षीय तरुणाला अटक
जम्मू काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता याना मीरने UK संसदेत दिले धडाकेबाज भाषण (Watch Video)
तरुणाच्या नाकातून डॉक्टरांनी काढले चक्क 150 जिवंत किडे, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Share this article