
शिवसेना UBT खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या work-from-home आणि energy saving आवाहनावर टीका केली. पेट्रोल-डिझेलचे दर, गॅस सिलेंडर महागाई, कांदा खराब होण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलं. तसंच मंदिर भेटी आणि धार्मिक कार्यक्रमांमागे सरकार खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष हटवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.