
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी लाडकी बहीण योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. लाखो लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळल्याचा उल्लेख करत, निवडणुकीसाठी जनतेचा पैसा वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. CAG अहवालातील मुद्द्यांचा संदर्भ देत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. राज्याच्या वाढत्या कर्जाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच नीट परीक्षा, युवकांचे प्रश्न आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा संसदेत जोरदारपणे उपस्थित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.