Aditya Thackeray यांचा मुंबई पावसावर सरकारला सवाल | Rain | BMC | UCC

Published : Jun 24, 2026, 07:00 PM IST

Aditya Thackeray यांनी मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकार आणि प्रशासनावर टीका केली. गेल्या चार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि प्रशासन अशा सर्व स्तरांवर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण असूनही पाणी तुंबण्याच्या समस्या कायम असल्याचे त्यांनी म्हटले. पावसाचे व्यवस्थापन, पाण्याची कमतरता आणि रेनवॉटर स्टोरेजसारख्या प्रकल्पांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय त्यांनी मुंबईतील खड्डे, नालेसफाई, कायदा-सुव्यवस्था, BMC मालमत्ता, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. समान नागरी कायदा (UCC) प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच राम मंदिर निधी प्रकरण, उज्जैनमधील कथित घोटाळा आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले.