
शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेस्ट एशिया संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. २५ दिवसांनी सरकारला सर्वपक्षीय बैठकीची गरज का वाटली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी लोकसभेत चर्चेची मागणी करत राहुल गांधी यांच्या वक्तव्यालाही समर्थन दिलं. तसेच देशात शांती कुठे आहे, असा सवाल करत सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. डिलिमिटेशन आणि जातीय जनगणना (Caste Census) या मुद्द्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली असून, विरोधकांसोबत चर्चा आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.