देशात LPG सिलेंडरच्या दरवाढीवरून राजकारण तापलं आहे. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कॉमर्शियल सिलेंडरच्या उपलब्धतेवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (UBT)च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, सरकारने पुरेसा साठा असल्याचं सांगितलं होतं, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसत आहे. “सरकार फक्त मोठ्या घोषणा करतं, पण त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागतो,” अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्रातून काँग्रेसच्या खासदार राजनी पाटील यांनी देखील गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, LPG सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ झाली असून, त्यामुळे महागाईचा आणखी ताण सामान्य नागरिकांवर पडत आहे. तसेच, कॉमर्शियल सिलेंडर बाजारात उपलब्ध नसतील तर होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशाच Breaking Political News, Maharashtra Politics, National News Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.