मुंबईत आयोजित VforD (Youth For Development) च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोजगार आणि विकसित भारत 2047 या विषयांवर भाष्य केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात युवांना नव्या कौशल्यांनी सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल होणार असून, त्यासाठी युवकांना तयार करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच CSR आणि सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या संस्थांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.