मनिष सिसोदिया यांना धक्का: जंगपुरा मतदारसंघातून पराभव, '६०६ मतांनी मी हरलो'
Feb 08 2025, 01:02 PM ISTदिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने २७ वर्षांनी सत्ता पुन्हा मिळवली आहे. मात्र, आपचे प्रमुख नेते मनिष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून पराभव झाला आहे. सिसोदिया यांना ३४,०६० मतं मिळाली, तर भाजपाच्या तरविंदर सिंग मारवाह यांनी ६०६ मतांनी विजय मिळवला.