हवामान विभागानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस होणार असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यातील वालावल, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, वाकडी, पिंपळगाव, वरखेडी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी, पालशी, पाथर्डी आणि कारेगाव या मंडळांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.