Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला असून ५ नोव्हेंबरला ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली तर विदर्भात हवामान कोरडे राहील.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकट दाटले आहे. हवामान विभागाने 5 नोव्हेंबर रोजी पाच जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, तर 7 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
27
मुंबईत अधूनमधून हलका पाऊस
मुंबई आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.
37
कोकणात यलो अलर्ट
5 नोव्हेंबर: रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’
6 नोव्हेंबर: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.