उदय सामंत: विद्यार्थी आंदोलनात राजकारणाचा आरोप | Student Protest | NDA | Uday Samant

Published : Jul 28, 2026, 01:00 PM IST

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया देत, जनतेने नाकारलेल्या काही राजकीय पक्षांकडून विद्यार्थी आंदोलनात घुसखोरी होत असल्याचा आरोप केला. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, एनडीएतील शिवसेना आणि इतर मित्रपक्ष नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. काही नेते आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली. याशिवाय, उद्योग बंद होत असल्याच्या दाव्यावर संबंधितांना प्रत्यक्ष बैठकीसाठी येण्याचे आव्हानही त्यांनी दिले.