
उद्धव ठाकरे ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार नसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी दिली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. 2009 मधील कथित बदनामी प्रकरण अंतिम टप्प्यात असून सरकारी पक्षाकडून नवीन पुरावे सादर केले जाणार नसल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात आनंद परांजपे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे एक स्थानिक पदाधिकारी आरोपी आहेत.