भाजप नेते राम कदम यांनी सना मलिक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली. भारताच्या संविधानाचा आणि महिलांच्या सन्मानाचा उल्लेख करत बहुपत्नीत्वाच्या समर्थनाला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच समान नागरी कायदा देशाची गरज असल्याचं सांगत तो लवकर लागू व्हावा अशी भूमिका मांडली. याशिवाय उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं. विरोधकांकडून होत असलेल्या वक्तव्यांवर त्यांनी प्रतिक्रिया देत राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.