
Kirit Somaiya यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निवासी संकुलांमध्ये प्राण्यांची कुर्बानी देऊ नये अशी मागणी केली. मुंबई महापालिका, पोलीस आयुक्त आणि महापौरांनी यावर कठोर कारवाई करावी, असं आवाहन त्यांनी केलं. कुर्बानी फक्त अधिकृत कत्तलखाने आणि परवानाधारक ठिकाणीच व्हावी, residential societies मध्ये नाही, असं सोमय्यांनी स्पष्ट केलं. सण शांततेत पार पडावा आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचंही त्यांनी सांगितलं.