
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जंतरमंतर आंदोलनावर प्रतिक्रिया देताना लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार सर्वांना असल्याचे सांगितले. मात्र, बिनापरवानगी आंदोलन, हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नसून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील आंदोलनात काही लोक चांगल्या हेतूने सहभागी असतील, मात्र काही जण स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी आंदोलनात घुसल्याचा आरोप त्यांनी केला. अनेकांना NEET परीक्षेबाबत मूलभूत माहितीही नसल्याचा दावा करत त्यांनी काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केल्याची माहिती दिली. त्यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन सर्वांनी आवर्जून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच उद्या पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.