
ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या सर्वांनी विकास काम होत नव्हती, निधी मिळत नव्हता अशी कारण दिली आहेत. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं या खासदारांनी स्पष्ट केलं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी खासदार निधीतून मिळालेली माहिती दिली आहे.
खासदार निधीवरून ओमराजे निंबाळकर यांनी माहिती दिली आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात १८ कोटी रुपये निधी मिळाल्याचं सांगितलं आहे. त्यातून त्यांनी १३० कामे प्रस्तावित असून त्यातली २१ काम पूर्ण झाली असल्याचं माहिती दिली. त्या सर्व कामांचा निधी वितरित केल्याचं ओमराजे यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
मला मिळालेल्या निधीतील एकही रुपया शिल्लक राहिला नसल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. खासदार निधीवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. खासदार निधी खर्च करण्याची मुदत हि ५ वर्षांची असते. त्या मुदतीत निधी खर्च झालाय का नाही हे आपण आधी तपासून पहिला हवं असं त्यांनी म्हटलं आहे.
खासदाराला वर्षभरात पाच कोटींचा निधी मिळतो असं यावेळी बोलताना ओमराजे यांनी सांगितलं आहे. माझ्या मतदारसंघात २४७५ बूथची संख्या आहे. एका बूथला १ लाख ३००० रुपये मिळते. एका लाखात कोणते काम होते हे त्यांनी यावेळी विचारलं आहे.