जरांगे-पाटील यांची मागणी आणि 'ट्रिपल टेस्ट'
मनोज जरांगे यांची मागणी घटनात्मकदृष्ट्या शक्य आहे, परंतु ती कायदेशीर अटींवर आधारित आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी तीन महत्त्वाच्या अटी ठरवल्या आहेत, ज्याला ‘ट्रिपल टेस्ट’ असे म्हणतात.
राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस, मराठा समाजाला मागास घोषित करणं आवश्यक.
नवीन, ताजा आणि सुसंगत डेटा, मागासपणाचे समर्थन करणारा अद्ययावत डेटा आवश्यक आहे.
५०% मर्यादेच्या आत आरक्षण, ही मर्यादा ओलांडता येत नाही, अन्यथा आरक्षण असंवैधानिक ठरते.