"महाराष्ट्राला विभागांमध्ये कधी पाहिलं नाही"
जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की, "सातारा गॅझेटच्या आधारावर पश्चिम महाराष्ट्रातील मराठेही आता आरक्षणात सामावतील. मी कधीही महाराष्ट्राला खान्देश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ अशा विभागांमध्ये न पाहता, एकसंध समाज म्हणून पाहतो. म्हणूनच हा लढा समाजाने उचलून धरला." मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांची पाठ थोपटत त्यांच्या लढ्याचं कौतुक केलं.