या योजनेद्वारे लाभार्थ्यांना चार एकर जिरायत किंवा दोन एकर बागायत जमीन खरेदी करण्याची परवानगी आहे. शासनाने यासाठी दरही निश्चित केले असून,
जिरायत जमिनीसाठी एकरी ५ लाख रुपये,
बागायत जमिनीसाठी एकरी ८ लाख रुपये
इतके अनुदान देण्यात येते.
मात्र सध्याच्या बाजारभावाशी तुलना करता हे दर अपुरे ठरत असल्याचं वास्तव आहे. अनेक जिल्ह्यांत शेतजमिनीचे भाव या मर्यादेपेक्षा खूपच जास्त असल्याने या अनुदानात जमीन मिळवणं जवळपास अशक्य झालं आहे.