मुंबई : देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हं आहेत. केंद्र सरकारने शुल्कमुक्त कापूस आयातीच्या निर्णयाला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याआधी १९ ऑगस्टपासून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ही सवलत लागू होती. मात्र आता ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता मोठी आहे, कारण स्वस्त दरात आयात होणाऱ्या कापसामुळे देशांतर्गत बाजारात कापसाचे दर कोसळू शकतात.