मुंबईहून एलिफंटाला जाणारी बोट बुडाली; कसा झाला अपघात? व्हिडीओ!

Published : Dec 18, 2024, 07:20 PM ISTUpdated : Dec 19, 2024, 10:09 AM IST
Mumbai Boat Accident

सार

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट बुडाली. ८० प्रवाशांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून, ६६ जणांना वाचवण्यात आले आहे. स्पीड बोट धडकल्याने हा अपघात झाल्याचा आरोप आहे.

मुंबई: गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. बोटीत ८० प्रवासी होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ६६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. 

स्पीड बोटने मुंबईहून एलिफंटा लेणीकडे जात असताना अरबी समुद्रातील बुचर आयलंडजवळ नीलकमल बोटीला धडक दिल्याचा आरोप बोट मालकाने केला आहे. यामुळे बोट पाण्याने भरली आणि ती बुडाली.

 

नौदल, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन ३ आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य केले. ४ हेलिकॉप्टरही बचाव कार्यात गुंतले होते. प्रवाशांना गेट वे ऑफ इंडियावर परत आणले गेले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून दिली माहिती

एलिफंटा येथे जाणाऱ्या नीलकमल बोटीला अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली. नौदल, तटरक्षक दल, बंदर, पोलिसांच्या बोटी तात्काळ मदतीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आम्ही जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत, सुदैवाने बहुतांश नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र, अजूनही बचावकार्य सुरूच आहे. त्या सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आणखी वाचा-

कल्याणकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये महिलांच्या डब्यात नग्न व्यक्तीचा प्रवेश

डोंबिवलीत माणकोली पुलावरून उडी मारून १५ वर्षीय मुलीची आत्महत्या

PREV

Recommended Stories

पाप लपवण्यासाठी मृत्यूला मिठी! पुण्यात स्पा सेंटरवर छापा पडताच महिलेचा करुण अंत; मॅनेजरची अवस्था गंभीर!
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात