
राज्यमंत्री योगेश कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास 9000 दिवसांच्या अखंड कामाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षांत एकही दिवस सुट्टी न घेता काम करणं हे अत्यंत प्रेरणादायी आहे. तसंच साताऱ्यात घडलेल्या घटनेवर आणि नाशिकमधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार कोणत्याही प्रकारचा तडजोड न करता सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. दापोलीच्या विकासाबद्दलही त्यांनी आपलं स्वप्न व्यक्त केलं असून कोकणाच्या प्रगतीसाठी काम करण्याची भूमिका मांडली.