बारामती पोटनिवडणुकीत विजयानंतर Sunetra Pawar यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. हा विजय म्हणजे दादांवर बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांना वाहिलेली आदरांजली असल्याचे त्यांनी म्हटले. जल्लोष न करण्याचे आवाहन करत, संयम आणि शिस्त पाळण्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. अजित पवारांच्या विकासकामांवर जनतेचा विश्वास असल्याचे सांगत, बारामतीच्या विकासासाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच देशातील इतर राज्यांमध्ये NDA आघाडीवर असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही त्यांनी केले.