
Eknath Shinde यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत पंतप्रधान Narendra Modi यांच्या कामाचं समर्थन केलं. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच जिल्हा नियोजन बैठकीत शेतकरी, खरीप हंगाम, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती यावर विशेष भर देण्यात आला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नव्या पद्धतीच्या शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणी साठवण क्षमता वाढवणे, तलावांची दुरुस्ती आणि बियाण्यातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.